DONATE NOW

Friday, December 3, 2021

"शुभम संजय वाघ आधारच्या मदतीने आय टी आयला दाखल..."


वडील लहानपणी वारलेले.आई मजुरी करुन कशीबशी कुटुंब चालवायची. मोठा मुलगा कॉलेजला जाऊ लागला. आता मुलांचा आधार मिळेल.आईला खूप बरं वाटायचं. पण अचानक मोठ्या मुलाचा मित्रांकडून घात झाला. आभाळच कोसळलं... नव-याच्या धक्यातून बाहेर यायच्या आतच मुलाचा दुसरा धक्का बसला, अन् आईवर मानसिक परिणाम झाला.  

आई संगिता हीस श्रीरामपूर येथील डॉ. उंडे यांचा उपचार चालू असून दर महिन्याला दोन ते अडीच हजार रूपये खर्च येतो. शुभम सुट्टीत शेतात मिळेत ते काम करून थोडेफार येणाऱ्या पैशात कुटुंब चालवून शिक्षणही घेत आहे. आईच्या मानसिक असंतुलनामुळे घरी आल्यावर स्वयंपाक करण्यासाठी त्याला वयोवृद्ध लिलावती आजीला मदत करावी लागते.

     परवा मदत घेण्यासाठी आजीही शुभम सोबत आली होती. "सर, शुभमला स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे.. असं काही पुण्याचं काम करा.. लई उपकार होतील." हे सांगताना तिची मान डुगडुग करत होती." बोलताना तिचा आवाज कापत होता, डोळ्यात अश्रू होते. मी आजीला व शुभमला धीर दिला.

अमृतवाहिनी आयटीआयचे प्राचार्य एस टी देशमुख  यांनी शुभमची परिस्थिती समजून घेतली. त्याला फिटर ट्रेडसाठी प्रवेश दिला.ते शुभमला "अर्न अँड लर्न" योजनेत सहभाग देणार आहेत. उरलेल्या फी बाबत शिष्यवृत्ती मिळवून देणार आहेत.

 इतर सहकार्य करणार असल्याची माहिती प्राध्यापक बाळासाहेब आहेर यांनी दिली.शुभम अत्यंत संघर्षात १२ वी झाला असून शेतात मिळेल ते काम करुन कुटुंब चालवत आहे.

आधारने नुकतेच शुभमला दत्तक घेतले असून अमृतवाहिनी आय टीआय कॉलेजला प्रवेश दिला आहे.

शुभमच्या प्रवेशासाठी आधार फाऊंडेशन संस्थेने नुकताच *दहा हजार रुपयांचा चेक* दिला. वह्या,सॅक,आदी साहित्य दिले.

शुभमला तिगाव ते अमृतवाहिनी  कारखाना, अमृतनगर हे २५ किलोमिटर अंतर ये-जा करायचे आहे. एसटीचा संप असल्याने दररोज त्याचा ९० रु खर्च कसा करावा हाही प्रश्न आहे. 

पण शुभम अत्यंत समजदार आहे.संघर्ष करायची त्याची तयारी आहे. जिद्द अन् प्रयत्नांची पराकाष्ठा करत आधारच्या साथीनं त्याला आपण बळ देऊया.. माणूसपण जपत त्याच्या पंखात बळ देऊया.


No comments:

Post a Comment

निराधारांची सावली व अनाथांची माऊली असणाऱ्या आधार परिवाराचं रोपटं आता वटवृक्षात रुपांतरीत झालंय..!

We offer hope for childs, You can help!


माणसाला माणूस जोडला जावा. माणूसपण जपले जावे, माणसाचे माणुसकीचे व हृदयाचे नाते निर्माण व्हावे.
या आंतरिक ओढीने आधार परिवार सतत चिंतनशील व कृतीशील असतो.